वटपौर्णिमा
धाग्यांनी बंदिस्त होऊन आता वडही विटलाय
पौर्णिमेलाच काय तो वडाचा पुळका
नाहीतर कावळे आहेतच नेहमीचे सोबतीला
सावित्रींच्या वरांना दयायला वर
अडकवलाय याने सात फेर्यांमध्ये इथला प्रत्येक नर
तरी सावित्री या करती त्याला जखमी वर
चार पानांची फांदी बाजारात,विचारती काय आहे याचा दर
एक दिवस मान देउन,मग फेकुन देती रस्त्यावर
आता पौर्णिमा आली की, वडालाही लागे या सावित्रींचा डर
नका रे असे ओरबाडू त्याला, ऐकला का कोणी त्याचा आर्त स्वर
Labels: timepass
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home