अनुभूती an experience !!

Wednesday 8 October, 2008

प्रश्न ?

आज जे जे वाटतयं, आठवतयं, अडखळतेय, कुठेतरी ठेचाळतय, ते सगळ सांगायचं आहे; कचकड्याचा भार कमी करायचा आहे जरा.


समांतरपणाच्या दिशांनी साकळलेलं आयुष्य प्रवाही का नाही करायचं ?
का म्हणून सात्विक भावांची स्निग्धता जपायचा बडेजाव करायचा ?


हे रस्ते आपणच घडवित असताना,
नीती- अनीतीच्या सनातन कसोट्यांत का स्वतःला बुकलून घ्यायचं ?


आपल्या सार्‍या आणि सार्‍याच संर्दभांच जितेपण अजून ताजं असताना,
का रहायचं अशा हस्तिदंती मनोर्‍यात?
साचेबंद आयुष्यात..........

Labels:

3 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]



<< Home