वाट

बंद दरवाजा ठोठावण्याने मी एकदम भानावर आलो
माझ्या घराची दारं सताड उघडी ठेवून
त्यांची वाट पाहत मी असा उभा
त्यांची वाट पाहत मी असा उभा
तरीही त्यांची पावलं बंद घराकडेच वळली
त्या पावलांवरच माझी वाट भाळली
पाऊलवाटेची सारी गूपितं पावलांनी शोधून काढली
आणि तरीही वाट चालतच राहीली
कधी फुलांना झेलत, कधी काट्यांनी टोचत
,तशी दारावरची थाप जागीच होती
आपल्याच गावाला साद घालत होती
माझ्या दारात तुळस सजलेली
घरातून नाद घुमतच होता
तेव्हा आवाजाचं प्रतिबिंब घराबाहेर सापडलं
तर ते म्हणालं,
मी माझ्या धन्याचा प्रतिध्वनी; आपला काही संबंध नाही.
तितक्यात आतून खळकन् आवाज तुटल्याचं ऐकू आलं . . .
. . . . आणि अजूनही दारावर थाप पडतेच आहे
,तशी दारावरची थाप जागीच होती
आपल्याच गावाला साद घालत होती
माझ्या दारात तुळस सजलेली
घरातून नाद घुमतच होता
तेव्हा आवाजाचं प्रतिबिंब घराबाहेर सापडलं
तर ते म्हणालं,
मी माझ्या धन्याचा प्रतिध्वनी; आपला काही संबंध नाही.
तितक्यात आतून खळकन् आवाज तुटल्याचं ऐकू आलं . . .
. . . . आणि अजूनही दारावर थाप पडतेच आहे
Labels: hope
2 Comments:
kya baat hai
By
HAREKRISHNAJI, At
14 February 2009 at 7:30 pm
thank u HKji
By
वर्षा ऋतु, At
15 February 2009 at 11:27 pm
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home